Ganesh Chaturthi 2021 LIVE Updates: आज गणरायाचं आगमन, गणेशोत्सवाचं लाईव्ह अपडेट्स
Ganpati Sthapana : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना होत आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Sep 2021 01:46 PM
पार्श्वभूमी
Ganpati Sthapana Vidhi : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10...More
Ganpati Sthapana Vidhi : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. गणरायाची यथासांग पूजाअर्चा करुन गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेशोत्सवाचे 10 दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडतील. त्यापूर्वी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त, विधी काय? याविषयी जाणून घेऊया... गणरायाची स्थापना करण्यासाठी भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्यानं त्या दिवशी जमलं नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. तर एखाद्या वर्षी कोणत्याही कारणानं गणरायाची प्रतिष्ठापना करता आली नाही तर, पुढच्या वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करु शकता. यंदाच्या वर्षी पहाटेपासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गरायाची स्थापना आणि पूजा करता येईल. उत्तम मुहूर्त म्हणून गणपतीची घरी पहाटे 4:50 पासून दुपारी 1:50 पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकतो. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात बाप्पाची मूर्ती घराघरांत आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून, अक्षता अर्पण करुन औक्षण केलं जातं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर मुर्तीची स्थापना केली जाते. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वात आधी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मूर्ती ठेवली जाते. मुर्तीवर गंगाजल शिपडून देवाला जानवं घातलं जातं. सर्वात आधी गणरायाला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या श्रद्धेप्रमाणे घराघरांत दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
खासदार नवनीत राणा यांच्या घरी बाप्पाचं आगमन
अमरावती शहरात आणि जिल्ह्यात गणपतीसाठी इको फ्रेंडली डेकोरेशन तयार करण्यावर भर दिला गेला आहे.. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीतही मोठा उत्साह या गणपती बाप्पाच्या आगमनावेळी पाहायला मिळत आहे.. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचं अख्खं कुटुंब सहभागी झाले होते...