मुरलीधर राऊत यांचं बाळापूर-अकोला मार्गावरील पारस फाट्याजवळ 'मराठा' नावानं हॉटेल होतं. त्यांचं हे हॉटेल आणि शेत सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या भूसंपादनात गेलं. नोटबंदीच्या काळात त्यांनी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या दोन महिन्यात पैशांचा आग्रह न करता मोफत जेऊ घातलं.
16 नोव्हेंबर 2016 च्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राऊत यांच्या सेवेचा गौरव केला होता. तब्बल दोन मिनिटांपेक्षा जास्तवेळ ते राऊत यांच्या सेवाभावावर बोलले होते. आपलं हॉटेल अन शेत महामार्गात गेल्याने वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर यांचा इतर शेतकऱ्यांसोबत संघर्ष सुरु आहे. शेवटी न्याय मिळत नसल्याने त्यांनी काल इतर सहा शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रक्रूती सध्या स्थिर आहे.
अकोल्याच्या दिलदार हॉटेलवाल्याचं पंतप्रधानांकडून कौतुक