मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत यावर चर्चा झाली.


लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन, सूचना दुकानदारांनी पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.


कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर


राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. राज्यात आज कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाशीतील एका खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यूू झाला आहे.


राज्यातील जिल्हा आणि महापालिकानिहाय रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई - 49

  • पिंपरी चिंचवड - 12

  • पुणे - 18

  • सांगली - 9

  • नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली - 6

  • नागपूर - 5

  • यवतमाळ - 4

  • अहमदनगर - 3

  • ठाणे - 3

  • सातारा - 2

  • पनवेल - 2

  • उल्हासनगर - 1

  • औरंगाबाद -1

  • रत्नागिरी - 1

  • वसई-विरार - 1

  • पुणे ग्रामीण - 1

  • सिंधुदुर्ग - 1

  • मृत्यू - 4


संबंधित बातम्या :  


 

Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळ देणारा व्हिडीओ; नागपुरमधील कोरोनाग्रस्ताचा अनुभव