Maharashtra River Linking Project : महाराष्ट्र हे मजबूत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागात सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतोय. या अडचणींचा सामना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नदी जोड प्रकल्पांना (Maharashtra River Linking Project) गती देणार आहेत. 


दरम्यान, राज्यातील सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कटिबद्ध होते. 2019 मध्ये त्यांनी नदी जोड प्रकल्पासाठी गुजरातकडून मदत घेण्यास नकार दिला होता. हा प्रकल्प महाराष्ट्र स्वतंत्रपणे पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर प्रगती मंदावल्याचे चित्र दिसत आहे. 


अनेक भागांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय


धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, माण, खटाव, धाराशिव, लातूर, पश्चिम विदर्भ आदी भागांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या या भागात अनेकदा दिसून येतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी या दुष्काळी भागात पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्येत वाढ 


पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी या दुष्काळी भागात पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पाणीटंचाईची आव्हाने अनेक वाहत्या नद्या असूनही महाराष्ट्राला पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. उदाहरणार्थ, गोदावरी नदीचा उगम नाशिकमधून होतो परंतु नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.