मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5218 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एकूण 150 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


एकट्या मुंबईत आज 419 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण 19 मृत्यूपैकी 12 जण मुंबईतील आहेत. पुण्यातील तीन , पिंपरी आणि सांगलीतील एक आणि ठाण्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. कोरोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या 251 झाली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 नमुने निगेटिव्ह आले आहेत.


संबंधित बातम्या




Ratan Tata | बिल्डरांमुळे शहर नियोजनाचा पुरता बट्ट्याबोळ : रतन टाटा