मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. राज्यात कालपासून 55 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकट्या मुंबई 29 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढली आहे.


कालपासून कुठे किती रुग्ण आढळले?


कालपासून मुंबईत 29, पुणे17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबाद 2 असे एकूण 55 रुग्ण राज्यात आढळले आहेत. सद्यस्थितीला महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची सख्या 690 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 56 जण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा  मृत्यू झाला आहे.




संबंधित बातम्या :