साई संस्थानमध्ये भाजपाने शिवसेनेच्या वाट्याला एकही पद न दिल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला यापुढे कुठल्याही महामंडळात समाविष्ट न होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत सेनेच्या दबावतंत्राला यश आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अखेर संस्थान कार्यकारिणीत उपाध्यक्षपदासह तीन पदं देण्याचं मान्य केलं आहे. सेनेकडून रविंद्र मिर्लेकर यांना उपाध्यक्ष पद देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.