आज ते भेटीसाठी गेले असता मृत मुलाच्या नाराज मातेनं मंत्री सवारांची भेट घेण्यास नकार दिला आणि त्यांना दारातूनच हाकलून लावलं.
पालघर जिल्ह्यातील या आदीवासी पाड्यांमध्ये बऱ्याचदा कुपोषित मुलं आढळून येतात. अनेकदा यामुळे काही मुलं दगावतातही. मात्र, योग्य वेळी सरकारकडून मदत मिळत नसल्याचा आरोप येथील आदिवासींकडून करण्यात येत आहे.