बाजार समितीमध्ये शेतीमालाचे भाव आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांविषयी निर्णय घेतले जातात. मात्र. समितीच्या निवडणुकांमध्ये केवळ व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक विकास सोसायट्या आणि सहकारी सोसायट्याच सहभागी असतात. त्यामुळे आता थेट शेतकरी राजालाच मतदानाचा अधिकार देण्याच निर्णय फडणवीस सरकार घेऊ शकतं.
या निर्णयामुळे बाजार समित्यांमधील अनेक समिकरणं बदलू शकतात. सध्या बाजार समित्या या अप्रत्यक्षपणे स्थानिक राजकारण्यांतर्फे चालवल्या जातात.