मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बहाल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. फडणवीस सरकार लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.


बाजार समितीमध्ये शेतीमालाचे भाव आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांविषयी निर्णय घेतले जातात. मात्र. समितीच्या निवडणुकांमध्ये केवळ व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक विकास सोसायट्या आणि सहकारी सोसायट्याच सहभागी असतात. त्यामुळे आता थेट शेतकरी राजालाच मतदानाचा अधिकार देण्याच निर्णय फडणवीस सरकार घेऊ शकतं.

या निर्णयामुळे बाजार समित्यांमधील अनेक समिकरणं बदलू शकतात. सध्या बाजार समित्या या अप्रत्यक्षपणे स्थानिक राजकारण्यांतर्फे चालवल्या जातात.