Bird Flu in Maharashtra LIVE Updates | परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू, दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी
Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनापाठोपाठ देशासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 13 Jan 2021 12:21 PM

पार्श्वभूमी
Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा...More
Bird Flu in Maharashtra LIVE Updates : कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली. सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत. देशात कुठवर पसरला आहे बर्ड फ्लू? आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याची विचारणाही करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात, सावध व्हा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय स्थानिक जलस्त्रोतांच्या आजुबाजूला, प्राणसंग्रहालयात आणि कुक्कुटपालन केंद्रांतील परिस्थितीचा आढाव घेत इथं काटेकोरपणे नजर ठेवण्यावर जोर दिला. वन विभाग, आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग यांच्यातील जास्तीत जास्त समन्वय हे संकट थोपवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
परभणी : मुरुंबा पाठोपाठ असोला गावतही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दोन शेतकऱ्यांच्या 22 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गावाजवळ अनेक मृत कोंबड्या आढळून आल्या आहेत. मुरुंबा गावापासून 7 किलोमीटर अंतरावर असोला गाव आहे. जिल्ह्यात मुरुंबा, कुपटा, बनवस आणि असोला या 4 गावांत हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.