Beed News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीडच्या गोदावरी नदी क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसाने तसेच नाथसागरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आहे. परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

Continues below advertisement


गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा धोका 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीकाठच्या नागझरी, खामगाव अगरनांदूर यासह इतर गावांना पुराचा धोका आहे. पावसाने विद्युत पुरवठा बंद असल्याने मागील चार दिवसांपासून या गावात दळण वळणाची व्यवस्था नाही. तर पुराच्या पाण्यामुळे रस्ता नसल्याने मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. तांदूळ आणि कन्या खाऊन भूक भागवावी लागत आहे. गावातील अंगणवाडीत पाणी शिरलं आहे. त्यामुळं साठवून ठेवलेलं धान्य शालेय साहित्य पाण्यात भिजल्याच्या व्यथा संतप्त झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. 


27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा इशारा


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.


घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता


राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होवू शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSR च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे.


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Rains : विदर्भात पावसाचा कहर, पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; नाशिकच्या दिंडोरीतही जोरदार बॅटिंग, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट