एक्स्प्लोर

शिंदे-फडणवीस सरकार अनधिकृत! यांच्यामुळं अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; अजित पवारांचा घणाघात

Ajit Pawar On Maharashtra Government : 40 लोकांना या सरकारने मंत्रीपदाची गाजरं दाखवली आहेत. अनेक जणांनी मंत्री पद मिळावे म्हणून नवस केले आहे, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar On Maharashtra Government : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे अनधिकृत आहे. या सरकारकडून मविआच्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे. या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते अहमदनगरमधील तिसगाव येथे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. 

निवडणुका तर होणारच - अजित पवार

निवडणुका म्हटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही. त्यांनी पंढरपूरची निवडणूक, कोल्हापूर, देगलूर येथील निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला होता. म्हणजे इतर निवडणुका होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. शेवटी लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं आहे  त्यांना निवडून देईल, असे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले. 

या सरकारने मंत्रीपदाची गाजरं दाखवली -

सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर दिली होती. याची जाणीव शिवसेना सोडून गेलेल्यांना असायला हवी होती. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत. इतिहास बघितला तर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक ठिकाणी आमदार फोडून यांनी सरकार पाडले. यांचे सरकार आले, सुरुवातीला तर हे दोघांचंच सरकार होते. आम्ही टीका करून करून विस्तार केला, यांना एक महिला मंत्री भेटली नाही. महिलांना समान हक्क हे केवळ भाषणात बोलण्यापुरतं नसावं. 40 लोकांना या सरकारने मंत्रीपदाची गाजरं दाखवली आहेत. अनेक जणांनी मंत्री पद मिळावे म्हणून नवस केले, कुणी किती नवस केले माहिती नाही. पण या सर्वांमुळे राज्याचे नुकसान होत आहे,अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. कोंबडं कितीही झाकलं तरीही सूर्य उगवायचा राहत नाही, असे अजित पवार म्हणाले. 
 
सर्व जाती धर्मांचा आदर करावा, द्वेष करू नये

आम्ही कोणाच्याही जाती-धर्माला विरोध करणारी माणसं नाहीत. ज्याने त्याने आपल्या जातीचा धर्माचा आदर केला पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही, परंतु आपल्या धर्माचा आपल्या जातीचा आपण आदर करत असताना दुसऱ्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष करून चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

निवडणुकांमध्ये फटका बसेल म्हणून निवडणुका घेत नाहीत - अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार सरकारला आहे. आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्यांना झटका बसला आहे. त्यांनी कितीही आव आणला तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फटका बसेल, अशी भावना त्यांची झाली असल्यामुळे ते निवडणूक घेण्यात टाळाटाळ करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक असू शकते - अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ती पक्षाची भूमिका नाही. पक्षाचे प्रवक्ते किंवा नेते यांनी जर भूमिका मांडली असती तर ती ती पक्षाची भूमिका होती. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget