कोल्हापूर: कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. येत्या 5 मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास, ही कारवाई करण्यात येईल, असं जलसंपदा विभागाने म्हटलं आहे. तशी अंतरिम नोटीस कोल्हापूर महापालिकेला देण्यात आली आहे.


कोल्हापूर मनपाची 2011 पासून थकबाकी आहे. ही थकबाकी आता 21 कोटी 94 लाख 54 हजारांवर पोहोचली आहे. इतकी मोठी रक्कम अद्याप न भागवल्याने, जलसंपदा विभागाने महापालिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

वारंवार मागणी करुन आणि नोटीस बजावूनही 2011 पासून थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने आक्रमक पाऊल उचललं आहे.

सध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.