सांगली: राज्यभरात समाधानकारक पाऊस होत असताना लातूरला मात्र अजूनही रेल्वेनं पाणीपुरवठा सुरूच आहे. लातूरला पाणी नेणारी शंभरावी जलदूत एक्सप्रेस मिरजवरून रवाना झाली.


 

या शंभराव्या फेरीमधून लातूरला आतापर्यंत २३ कोटी २० लाख लिटर पाणी रवाना करण्यात आलं आहे. लातूरला अपेक्षित पाऊस अजूनही झाला नाही. मांजरा धरणही अद्याप कोरडंच आहे. त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्यात यावा असा विनंतीवजा प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता.

 

रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तात्काळ मंजूरही केला. यामुळे जलदूतला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

 

दरम्यान जलदूत या एक्स्प्रेसच्या १०० फेऱ्यांचं भाडं हे अकरा कोटींवर पोहचलं आहे. आणि रेल्वे हे भाडं शासनाकडून वसूल करणार का हा प्रश्न अजून प्रलंबित आहे.

 

दरम्यान, मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सने मे महिन्यात ९४ लाख रुपयांची देणगी जलदूतसाठी दिली होती. त्यानंतर आणखी दोन संस्थनी देखील पन्नास लाख रुपये दिले होते.


संबंधित बातम्या


मिरज ते लातूर पाणी एक्स्प्रेसचा प्रवास कसा होता?


आणखी 10 वॅगन घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरला रवाना


मिरज-लातूर पाणी एक्स्प्रेसला तांत्रिक खोडा


पाणी एक्स्प्रेसच्या भेटीनंतर लातूरच्या विद्यार्थ्यांना जलबचतीचे धडे


देशमुखांच्या कारखान्यांमुळेच लातुरात पाणी टंचाई : खडसे


लातुरसाठी 10 लाख लि. पाणी देतो, केंद्राने नेण्याची सोय करावी : केजरीवाल


ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?


५ लाख लीटर पाणी घेऊन अखेर 'पाणी एक्सप्रेस' लातुरात दाखल!