Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) भूसंपादन करण्यात आले आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आंबा ते चौकापर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. त्याबाबतचे निवाडे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 19 जानेवारीपासून गावनिहाय शिबिर घेतली जात आहेत. याबाबतची माहिती प्राधिकारी तथा भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी दिली आहे. 


या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करताना (Nagpur-Ratnagiri National Highway) आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.


Nagpur-Ratnagiri National Highway | नुकसानभरपाई रक्कम वाटपाकरिता गावनिहाय शिबिर पुढीलप्रमाणे 



  • 23 जानेवारी : देवाळे (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा), आवळी (पन्हाळा), नेबापूर (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा)

  • 24 जानेवारी : खुटाळवाडी (शाहूवाडी), डोणोली (शाहूवाडी), वाडीचरण (शाहूवाडी), चरण (शाहूवाडी)

  • 25 जानेवारी : ठमकेवाडी (शाहूवाडी), बांबवडे (शाहूवाडी), गोगवे (शाहूवाडी), सावे (शाहूवाडी)

  • 26 जानेवारी : भैरेवाडी (शाहूवाडी), करंजोशी (शाहूवाडी), ससेगांव (शाहूवाडी), कोपार्डे (शाहूवाडी)

  • 27 जानेवारी : पेरीड (शाहूवाडी), कडवे (शाहूवाडी), जाधववाडी (शाहूवाडी), येलूर (शाहूवाडी)

  • 28 जानेवारी : करुंगळे (शाहूवाडी), निळे (शाहूवाडी), वालूर (शाहूवाडी), वारुळ (शाहूवाडी)

  • 29 जानेवारी : चांदोली (शाहूवाडी), केर्ले (शाहूवाडी), चनवाड (शाहूवाडी)

  • 30 जानेवारी : आंबा (शाहूवाडी) व तळवडे (शाहूवाडी) 


Nagpur-Ratnagiri National Highway : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन 


दरम्यान, देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे उद्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) देवस्थान इनाम जमीनी संपादित केल्या आहेत, त्याचा मोबदला राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार द्यावा, 50 टक्के रक्कम वहिवाटदार शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी भारतीय किसान मोर्चाची आहे.


या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमावेत चर्चा होऊनही कार्यवाही झालेली नाही. वास्तविक 1947 च्या पूर्वीपासून शेतकरी जमीनी कसत होते.7/12 कब्जेदार व इतर हक्कात त्याची नावेही आहेत. भूसंपादनासाठीच्या निवाडा नोटीसही याच शेतकऱ्यांच्या नावे आल्या आहेत. त्यानुसार इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहीजे अशी आग्रही मागणी या आंदोलनातून मांडली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आखत्यारीतील 132 मंदिरांशी 325 गुंठे जमीन सुध्दा संपादित होणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे. ही रक्कम 15 कोटी 79 लाख रुपये आहे.


इतर महत्वाच्या बातम्या