कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत असल्याने गुलाल कोणाला लागणार? याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघांमध्ये ठोकलेला तळ त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी केलेला घणाघाती प्रचार आणि अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर यांची झालेली एन्ट्री यामुळे हातकलंगले समीकरण अतिशय रोमांचक वळणावर जाऊन पोहोचलं आहे. 

Continues below advertisement






हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी-पन्हाळा, इस्लामपूर आणि शिराळा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे या मतदारसंघाचे राजकारण सांगली आणि कोल्हापूर असं विभागलं गेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी विजय कोणाचा होणार याबाबत यासाठी 4 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 


कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान 


आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये 8.50 टक्के मतदानाची नोंद हातकलंगले तालुक्यामध्ये झाली. शिरोळ तालुक्यामध्ये 8.20 टक्के मतदानाची नोंद झाली. इचलकरंजीमध्ये 7.91 टक्के मतदानाची नोंद झाली. इस्लामपूरमध्ये 7.76 टक्के मतदानाची नोंद झाली. शाहूवाडीमध्ये 6.21 टक्के मतदानाची नोंद झाली, तर शिराळा तालुक्यात शिराळामध्ये 6.60 टक्के मतदानाची नोंद झाली.






मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः तळ ठोकला


या मतदारसंघांमध्ये कमीत कमी 40 टक्के मतदान घेणारा उमेदवार विजयी होतो, असं आजवरचं समीकरण आहे. त्यामुळे इतक्या मतांचा पल्ला गाठण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून ताकतीचे प्रयत्न झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः तळ ठोकला होता. 


मुख्यमंत्र्यांनी हातकणंगले तालुक्यातील साखर कारखानदार, सहकारी संस्था, आजी माजी नगरसेवकांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महायुतीच्या धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले होते. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, सत्यजित पाटलांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून  जाहीर झाल्याने दुरंगीवरून तिरंगी लढत झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या