Narendra Modi, Jalgaon : नेपालमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे 26 मृतदेह आज (दि.24) विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या जळगाव जिल्ह्यात लखपती दीदीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे नेपाळ अपघातातील मृतांवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. 


एकनाथ खडसे काय काय म्हणाले?


नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तींचा आकडा वाढला आहे.  नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा  मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 30 वर पोहचला आहे. ही  घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातामध्ये माझ्या बालपणीच्या मित्राचा मृत्यू झालाय, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 


मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं


नेपाळ येथून जळगाव विमानतळावर मृतदेह आणण्यात आले. त्यानंतर  रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मृतदेह वरणगाव येथे पोहोचले आहेत. वरणगाव येथील मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केलं. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आजच रात्री मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 


आता निमंत्रण मिळालं तर जाणार नाही, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली नाराजी 


नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधन कारक असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं. वेळेत निमंत्रण मिळाला असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो.  मात्र आता निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Khadse : नेपाळमधील बस अपघातात माझा बालमित्र हरपला, मित्राच्या आठवणीनं नाथाभाऊ गहिवरले; वरणगावकडे 26 अँब्युलन्स रवाना