Gulabrao patil जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंद करत 2022 साली शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.  या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नेमकं का सोडून गेलो? याबाबत वक्तव्य केले आहे. 


शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो. तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो. 40 आमदार गेले त्यात जाण्यामध्ये माझा 33 वा नंबर होता, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना सोडून बाहेर पडल्यानंतरची सांगितली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील रीधुर गावातील अवचित हनुमान मंदिरावरील विकास कामांच्या सोहळ्यात जोरदार फटकेबाजी केली. 


जळगाव जिल्ह्यात दहा वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे 


ते म्हणाले की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आज अभिमान वाटतो की, तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज एवढी कामं झाले नसते. नुसतं गावात आपला सरपंच जरी नसला तरी किती हाल होता. सरपंच्यांच्या बाजूच्या माणसाच्या पोलवर गावात लाईट लागतो. विरोधकाच्या पोलवर लाईट लागत नाही. 16 महिन्यांमध्ये दहा वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा हा एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याचे नाव एकनाथ शिंदे आहे.  


भगवा झेंडा घेऊनच आम्ही काम करतोय


आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेनाप्रमुखांनी जो भगवा झेंडा आमच्या हातामध्ये दिला होता तो भगवा झेंडा घेऊनच आज आम्ही काम करतोय, उद्याही करणार आहोत आणि मरेपर्यंत करणार आहोत. माझ्या मतदारसंघात असे एकही गाव कुणी सांगू शकत नाही, त्या गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा निधी पोहोचला नाही. 


मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही


मी आठ वर्षापासून मंत्री आहे. पण कोणीही असं म्हणू शकत नाही की गुलाबराव पाटलांनी त्यांच्या अंगात मंत्रीपद आणलं. मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो पण मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray : मराठ्यांनो यांच्या भुलपाथांना बळी पडू नका ते अरबी समुद्रात शिवस्मारक! राज ठाकरेंनी वाभाडे काढले