राजनाथ सिंहांनी यावेळी काश्मीरमधील जनतेला शांततेचं आवाहन करून, चकमकी बंद झाल्या पाहिजेत. तसेच तरुणांना चिथवणी देणाऱ्यांचे चेहरे समोर आणले पाहिजेत, असे आवाहनही केले.
'' ज्याकाळात 12-14 वर्षीय मुलांच्या हातामध्ये कॉम्प्यूटर आणि पेन असण्याची गरज आहे, त्याकाळात ते बंदूक उचलत आहेत. नव्या पिढीतील तरुणांची माथी कोण भडकवत आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे,'' असे ते यावेळी म्हणाले.
''आम्ही काश्मीरच्या मुलांचे भविष्य भारताच्या मुलांप्रमाणेच असावे यासाठी प्रयत्नशील आहोत. पण जे लोक काश्मीरमध्ये अशांतता पसरवू पाहात आहेत, त्यांचे चेहरे काश्मीरच्या जनतेने उघडे पाडावेत,''असे आवाहनही त्यांनी यावेळी काश्मीरच्या जनतेला केले.