हैदराबाद: तेलंगणा राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. उष्णतेची तीव्रता एवढी आहे की एखादं अंड फोडल्यावर त्याचं चक्क ऑम्लेट बनतंय.


 

तेलंगणातल्या करीमनगर भागात या महिलेनं आपल्या अंगणात फरशीवरच अंड फोडून टाकलं आणि काही वेळातच त्याचं ऑम्लेट तयार झालं.

 

गेले काही दिवस सतत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असलेल्या तापमानाच्या काट्यानं तेलंगणावासीय हैराण झाले आहेत. भाजणाऱ्या उन्हामुळे लोकं घराबाहेर जाणं टाळत आहेत.

 

दुसरीकडे उन्हापासून मेंढ्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना टोप्या घालण्यात आल्या आहेत.