नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Israel) यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्रायलने (Israel) आक्षेप घेतला आहे. इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. इस्रायली दूतावासाने परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना ज्यू धर्मियांबाबत (यहुदी) केलेल्या ट्विटवर पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात, इस्रायली दूतावासाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबद्दल तक्रार केली आहे. राऊत यांनी ज्यू धर्मियांशी निगडीत ट्विट केले होते. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांना त्यांच्या  ट्विटने भारताच्या पाठीशी उभा राहिलेला देश कसा दुखावला आहे हे सांगावे अशी इच्छा आहे.


संजय राऊतांचे ट्विट नेमके काय?


14 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी गाझा हॉस्पिटलमधील “गंभीर परिस्थिती” बद्दल ट्विट केले होते. हिंदीत भाष्य करताना त्यांनी लिहिले की “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करतो हे आता समजले”. राऊत यांनी नंतर ट्विट डिलीट केले असले तरी तोपर्यंत इस्रायली अधिकाऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता. हे ट्विट हटवण्यापूर्वी 293,000 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले. सूत्रांनी ThePrint ला सांगितले की त्यांनी ही पोस्ट भारत सरकारला पाठवलेल्या मेलमध्ये देखील जोडली होती.


एक भारतीय खासदार भारतात यापूर्वी कधीही न पाहिलेला “यहूदीविरोधी” प्रकारात गुंतल्याचे पत्रात म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या सुरुवातीपासूनच राऊत इस्रायल-हमास युद्धाबाबत खूप बोलले आहेत. गेल्या महिन्यात, त्यांनी सत्ताधारी भाजपची तुलना दहशतवादी गटाशी केली होती आणि नंतर ते म्हणाले की भारत इस्रायलला पाठिंबा देत आहे कारण त्याने नरेंद्र मोदी सरकारला पेगासस “हेरगिरी” सॉफ्टवेअर पुरवले होते.


युद्ध चार दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय


दुसरीकडे, ओलीसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात करार झाला आहे. याअंतर्गत गाझा पट्टीतून 24 ओलिसांची सुटका करण्यात आली असून त्यात 13 इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या करारानुसार 39 पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेले युद्ध चार दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय इस्रायल आणि हमासने घेतला आहे. चार दिवसांत 150 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 50 ओलिसांची सुटका करण्याची योजना आहे. चार दिवस युद्ध थांबले असले तरी त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत. सर्वप्रथम, शांततेमुळे मानवतावादी मदत गाझापर्यंत पोहोचू शकली आहे, तर इस्रायललाही हमासच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून मुक्तता मिळाली आहे. मात्र, चार दिवसांच्या शांततेमुळे तीन बाबी सर्वांच्याच लक्षांत आहेत. प्रथम, शांतता कायम राहिल्यास काय होईल? दुसरे, चार दिवसांनी पुन्हा युद्ध सुरू झाले तर काय होईल? आणि तिसरे म्हणजे, युद्ध आता थांबू शकेल का?


शांतता टिकू शकते


अल जझीराच्या वृत्तानुसार, युद्धाबाबत पहिली शक्यता अशी आहे की इस्रायल आणि हमासमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते. हमास दररोज 10 ओलिसांची सुटका करू शकते. जवळपास 200 ओलिस हमासच्या कैदेत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ युद्ध 20 दिवस थांबू शकते. असे झाल्यास गाझामध्ये मानवतावादी मदतही सुरू राहू शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या