Russia Ukraine War : एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने 250 विद्यार्थ्यांसह रोमानियाहून भारतासाठी उड्डाण केले आहे. हे विमान उद्या दिल्ली विमानतळावर उतरणार आहे. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच आज युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले आहेत. 


गेल्या तीन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्यामुळे युक्रेमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 






दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान आज भारतात दाखल झाले आहे. रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान या विद्यार्थ्यांना घेऊन आज रात्री साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे. हे विमान मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. युक्रेनहून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केलं होतं.  


युक्रेनध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या