Republic Day 2022 : 26 जानेवारी हा भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1950 ला याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. यंदा भारत 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली. 26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का घोषित करण्यात आला? भारताच्या राज्यघटनेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे. चला तर आज या गोष्टी जाणून घेऊया.
भारताची संविधान सभा
9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता संविधान सभेची पहिली बैठक झाली. संविधान सभेत एकूण 210 सदस्य होते. त्यामध्ये 15 महिला सदस्यांचा समावेश होता. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विधानसभेत संविधानाचे उद्दिष्ट मांडले. 22 जानेवारी 1947 रोजी हे उदिष्ट पारित झाले.
26 जानेवारीला संविधान का लागू झाले?
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. परंतु, 26 जानेवारी रोजी ती अंमलात आली. याचे कारण असे की 26 जानेवारी 1930 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज म्हणून घोषित केले होते. त्यामुळे 20 वर्षांनंतर त्याच दिवशी राज्यघटना लागू झाली.
संविधानाची मूळ प्रत कुठे ठेवली आहे?
कागदावर हाताने लिहिलेली भारतीय संविधानाची मूळ प्रत संसद भवनाच्या ग्रंथालयातील नायट्रोजन गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. जेणेकरून संविधानाची मूळ प्रत जतन करता येईल.
राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले होते
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीनंतर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून भारतीय प्रजासत्ताका दिवसाच्या ऐतिहासिक घोषणा केली. स्वातंत्र्यानंतर 894 दिवसांनी भारत स्वतंत्र राज्य झाला.
महत्वाच्या बातम्या
- Cold Weather : मुंबईकर गारठले, मुंबईत निच्चांकी 14 अंश तापमान, पुढील 2 ते 3 दिवस थंडी कायम राहणार
- Tulsi Benefits for hair : केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीचे पानं, पांढऱ्या केसांच्या समस्येवर गुणकारी
- Viral News : लग्नात नववधूची खास स्टाईलमध्ये एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल