Ratan Tata Speech : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. काल आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना ते कमालीचे भावूक झाले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं. आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली आहेत, असं रतन टाटा यावेळी म्हणाले. आसाममधील 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचे (cancer Hospital) उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.





   रतन टाटा मुंबईतील कॅन्सर हॅास्पिटलवरील ताण कमी व्हावा म्हणून देशभरात कॅन्सर हॅास्पिटल सुरु करणार आहेत. आसाममध्ये एकून 17 हॉस्पिटल्स सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. रतन टाटा म्हणाले की, आसामला असे राज्य बनवा की सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे.  आसामच्या इतिहासातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कॅन्सर उपचारासाठी उत्तम दर्जाची सुविधा असलेलं आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. जागतिक स्तराची कॅन्सर उपचाराची सुविधा आसाममध्ये असेल असं ते म्हणाले.  
 
यावेळी रतन टाटा म्हणाले की, 'मला हिंदीत भाषण देता येत नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन. पण संदेश एकच असेल की माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करणार आहे.  आसामला असं राज्य बनवा ज्याला सर्वजण ओळखतील आणि ज्या राज्याची वेगळी ओळख असेल. 


पंतप्रधान मोदींनी मानले टाटा ट्रस्टचे आभार
यावेळी देशाचे पंतप्रधान मोदींनी टाटा ट्रस्टचे आभार मानले. आसामच नाही तर नॉर्थ ईस्टमध्ये कॅन्सर एक मोठी समस्या आहे. गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो. या रोगावर उपचारासाठी लोकांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. तसंच मोठा आर्थिक ताण देखील येतो. या वर्गांसाठी हे हॉस्पिटल मोठा दिलासा असणार आहेत. यासाठी मी सर्बानंद सोनोवाल आणि टाटा ट्रस्टचं आभार मानतो.