नवी दिल्ली : देशात आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदन (Post-mortem) करण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे देशातल्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन आता सूर्यास्तानंतरही होणार आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत ही माहिती  दिली.  काही विशिष्ट क्रिमिनल केसेस वगळता देशभरातल्या हॉस्पिटलला यासाठी परवानगी होती.  ब्रिटीशांच्या काळातील हा नियम रद्द करण्यात आला आहे. 


 मांडविया म्हणाले, ज्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्या रुग्णालयात आता शवविच्छेदन करता येणार आहे. या निर्णयामुळे अवयवदानासाठीची प्रक्रिया त्यामुळे सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत नाही. रात्री पोस्टमार्टम करण्यासाठीचं तंत्रज्ञानही आता उपलब्ध झाल्याने देशभरातल्या हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया सूर्यास्तानंतरही पार पाडली जाणार आहे.


केंद्र सरकारने या विषयी अधिक माहिती देताना सांगितले, काही मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री करता येणार नाही. जर हत्या, आत्महत्या, बलात्कार या घटनांच्या वेळी शवविच्छेदन करता येणार नाही. सरकारने आपल्या नव्या निर्णयासंबंधी संबंधित मंत्रालय  आणि विभाग, राज्य सरकारला या विषयी माहिती दिली आहे. 


संबंधित बातम्या :