PM Kisan Nidhi Yojana : शेतकऱ्यांना (Farmers) पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, लवकरच 18 वा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.


ऑक्टोबरमध्ये जमा होणार PM किसानचा 18 वा हप्ता


शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे  लाभार्थी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करु शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो. 


शेतकऱ्यांना 'या' नवीन सूचनांचे पालन करावे लागणार 



दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना 18 व्या हप्त्याची 2000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर दिलेल्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करुन घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. 


ई-केवायसीची प्रक्रिया खूप सोपी


ई-केवायसीची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये 'फेस ऑथेंटिकेशन फीचर' उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरी बसून OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात. विशेषतः दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीची आहे. याशिवाय, शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSCs) भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील मिळवू शकतात. जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ते विनामूल्य आहे, जर त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केवायसी केले तर त्याला काही शुल्क भरावे लागेल.


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या