नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस. 2016 च्या नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे नेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं तूर्तास तरी फेटाळली आहे. भविष्यातल्या काही शक्यता कोर्टानं खुल्या ठेवल्या असल्या तरी आजच्या घडामोडींचा मोठा परिणाम केसवर होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात नबाम रेबियाच्या अचूकतेचा मुद्दा सात न्यायमूर्तींकडे तूर्तास तरी जाणार नाही. आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील. पण हा गोंधळ दूर करण्यासाठी सोप्या शब्दात समजून घेऊयात आजचा निकाल काय आहे?