नवी दिल्ली : कोझिकोड विमान अपघात हा अपघात नसून खून असल्याचे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले. सुरक्षा सल्लागार समितीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या स्वत: च्या लेखापरीक्षणामध्ये सुरक्षाविषयक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. हा अपघात टाळता आला असता, असेही रंगनाथन म्हणाले.


लवकर योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर कोझिकोडमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातासारखेच अपघात जम्मू विमानतळांच्या पाटणा येथेही होऊ शकेल, असे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी सांगितले. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने गठीत केलेल्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य असलेले रंगनाथन म्हणाले की, कालिकत (आता कोझिकोड) विमानतळ लँडिंगसाठी सुरक्षित नाही, असा इशारा त्यांनी नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या अहवाल दिला होता.

Kerala Air India Plane Crash | केरळ विमान दुर्घटनेसाठी असू शकतात 'ही' तीन मुख्य कारणं

रंगनाथन यांनी कोझिकोड विमानतळाच्या बाबतीत टेबल-टॉप रनवे कमी जागेत असल्याने अधिक सुरक्षित साधनांची तिथे गरज असल्याचे सांगितले. कोझिकोड धावपट्टी बाबतही रंगनाथन यांनी काही सुधारणा सांगितल्या होत्या. त्यामुळे आतातरी सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काय आहे घटना?
दुबईवरुन येत असलेलं विमान अचानक दरीत कोसळलं आणि मोठा आवाज झाला. विमानात अडकलेल्या लोकांची आरडाओरड, अॅम्ब्युलेंसच्या आवाजाने परिसर दणाणला. भर पावसात हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. स्थानीक नागरिकांसह, पोलिस आणि बचावदलाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेत जखमींना विमानातून बाहेर काढत दवाखान्यात पोहोचवलं. केरळ विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 लोकांचा वाचवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती. ज्यात 174 प्रवाशी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळं विमान कोझिकोड रनवेवरुन घसरलं आणि 35 फुट खाली कोसळलं. एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले.

Kozhikode Airplane Crash | टेबल टॉप रनवे म्हणजे काय? | निवृत्त एअर व्हॉईस मार्शल नितीव वैद्य