India vs England, 4th Test LIVE Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; टीम इंडियाचा स्कोअर 24/1
India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2021 05:17 PM
पार्श्वभूमी
IND Vs ENG 4th Test Match : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी...More
IND Vs ENG 4th Test Match : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने अंतिम कसोटी ड्रॉ जरी केली तरी जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात ते न्यूझीलंडशी सामना करतील. इंग्लंड आणि भारत यांच्यातील अंतिम सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.अंतिम शर्यतीतून इंग्लंडचा संघ बाहेर पडला आहे. परंतु जर त्यांनी अंतिम कसोटी जिंकली तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर टाकतील. आणि टिम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. अशा सामन्यात ड्रॉ हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय असतो. मोटेराच्या नव्या खेळपट्टीवरील तिसर्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला गुलाबी बॉलवर खेळण्यास अनेक अडचणी आल्या आणि अवघ्या दोन दिवसातच भारताने 10 गडी राखून विजय मिळवला.डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या सरळ चेंडूंचा सामना करण्यास इंग्लंडच्या फलंदाजांना अडचण आली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रोली यांना वाटते की चौथ्या कसोटी सामना शेवटच्या दोन सामन्यांसारखाच असेल. मात्र गुलाबी बॉलपेक्षा खेळपट्टीवर लाल बॉल जास्त वेगाने येत नाही. त्यामुळे शेवटचा समाना टीम इंडियासाठीसाठी तरी महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघासाठी या सामन्यात फारसा धोका नाही. या सामन्यात इंग्लंड विजयासह मालिका ड्रॉ करण्यावर भर देईल. मात्र भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातू हा सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे.अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी आतापर्यंत मालिकेत 42 विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांनी पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 60 पैकी 49 विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटच्या सामन्यातही त्यांची ही कामगिरी कायम रहावी ही सर्व फॅन्सना आशा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत मालिकेत 296 धावा केल्या आहेत. तर अश्विनच्या नावे 176 धावा आहेत. अश्विनने चेपकच्या कठीण खेळपट्टीवर शतक ठोकले. रोहितशिवाय आतापर्यंत कोणताही भारतीय फलंदाज फिरकीपटू खेळपट्टीवर आत्मविश्वासाने खेळलेला दिसला नाही.अंतिम सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविना मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत उमेश यादव पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता त्याच्यासोबत इशांत शर्मा असेल की मोहम्मद सिराज हे पाहावं लागेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडियाचा स्कोअर एक विकेट गमावत 24 धावा इतका आहे. पुजाराने 15 धावा केल्या असून रोहित शर्मा 8 धावांवर खेळत आहे.