Delhi Rail Accident : दिल्लीत (Delhi) भीषण रेल्वे अपघात (Rail Accident) झाला आहे. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला असून मालगाडीचे 10 डबे रुळावरून घसरले. रेल्वे विभाग, अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरण्यात आले होते. या अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती सध्यातरी मिळालेली नाही. शनिवारी सकाळी 11.52 वाजता जाखिरा उड्डाणपुलाजवळ मालगाडी रुळावरून घसरली. ट्रेनचे नाव बीएचपीएल सीडीजी लोड आहे.


 


मालगाडीचे दहा डबे रुळावरून घसरले



उत्तर रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली विभागातील पटेल नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे दहा डबे रुळावरून घसरल्याचे वृत्त आहे. शहरातील जाखिरा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. रेल्वे पोलीस केपीएस मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, अपघाता दरम्यान ट्रॅकवर पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे.


 


 






 


रेल्वे उड्डाणपुलाखालून जात असताना ही घटना घडली


रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी दिल्लीतील सराय रोहिल्ला रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दहा डबे रुळावरून घसरले. जाखिरा उड्डाणपुलाखालून ट्रेन जात असताना ही घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव कार्य सुरू आहे. तसेच मालगाडीमध्ये लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरले होते,' असे सांगितले.


 


लोखंडी पत्र्याने भरलेले डब्बे


घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला ही रेल्वे मालगाडी असल्याचे आढळले, त्यातील 10 बोगी रुळावरून घसरल्या. माहिती मिळताच रेल्वेचे पथक, अग्निशमन दल, पोलिसांचे पथक आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली. मालगाडीत लोखंडी पत्र्याचे रोल्स भरलेले होते. मात्र, रुळांवर कोणीतरी अडकल्याची शक्यता असू शकते असाव बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे.


 


मागील वर्षीही असाच अपघात


याआधी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या गाझियाबादमध्येही मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. दिल्लीत गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर 2023 रोजी मालगाडीला अपघात झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती, या अपघातामुळे बराच वेळ गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. अपघाताबाबत चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती.