Coronavirus Updates : गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येनंतर आज त्यामध्ये काहीशी घट झाल्याचं पहायला मिळतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 244 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 25 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. 


देशामधील सक्रिय रुग्णसंख्या ही गेल्या 199 दिवसांतील सर्वात कमी झाली असून ती सध्या दोन लाख 70 हजार 557 इतकी आहे. देशात आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 94 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर एकूण चार लाख 48 हजार 817 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


 




लसीकरणाने ओलांडला 90 कोटींचा टप्पा
आतापर्यंत देशातील एकूण 65 कोटी 77 लाख 50 हजार 687 नागरिकांना कोरोना लसीचा पहीला डोस देण्यात आला आहे. तर 24 कोटी 42 लाख 59 हजार 810 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 डोस पूर्ण झाले आहेत. 


राज्यातील स्थिती 
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात काल  2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला. काल राज्यात 3 हजार 062  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 77  हजार 954  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 495 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


संबंधित बातम्या :