Coronavirus Cases India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत एक लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात यापूर्वी 13 एप्रिल रोजी दोन लाखांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी देशात 24 तासांत एक लाख 84 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काल (सोमवारी) देशात 3511 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीन लाख 26 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 69 लाख 48 हजार 874
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 40 लाख 54 हजार 861
एकूण सक्रिय रुग्ण : 25 लाख 86 हजार 782
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 3 लाख 7 हजार 231


भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) ने सांगितलं की, भारतात काल (सोमवारी) कोरोनामुळे 20 लाख 58 हजार 112 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. काल देशात एकूण 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 


राज्यात 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 22,122 नवीन रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात काल (सोमवारी)  42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात काल एकूण 3,24,580  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 361 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महाराष्ट्रात कोणकोणते जिल्हे रेड झोनमध्ये?


राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती.  बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Lockdown : राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे संकेत, राज्यातील सध्याची परिस्थिती काय?