आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरेकेट्स लगावले होते. हा अडथळा दूर करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी केला. यात महिलांसह पुरुष देखील सहभागी होते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाणी फवारणी केल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
उन्नाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात ती 90 टक्के भाजली होती. गंभीर असल्यामुळे तिला लखनऊहून एअरलिफ्ट करुन दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आले नाही. तिची प्राणज्योत मावळल्यानंतर देशात संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे. उन्नाव पीडितेच्या हत्याऱ्यांना फाशी देण्याची मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आली आहे.