Bihar : बिहार(Bihar)मधील  रोहतास जिल्ह्यामध्ये एक अजब घटना घडली आहे, कालव्यावर बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल गायब झाला आहे. दहा फूट रुंद आणि साठ फूट लांबी असणारा हा पूल चोरांनी JCBचा वापर करून चोरला. हा पूल अमियावर गावात असलेल्या आरा मुख्य कालव्यावर असलेल्या काँक्रीट पुलाच्या समांतर सुमारे पंचवीस फूट अंतरावर होता.  जेसीबी मशिनच्या साहाय्याने पूल पाडून ट्रकमध्ये भरून तो पूल  दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोखंडी पूलाचे लोखंड चोर ट्रकमधून घेऊन गेले. 


JCB चा वापर करून हा पूल चोरांनी पाडला आणि त्याचे जवळपास वीस टन लोखंड त्या चोरांनी चोरले आहे. तेथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पूल चोरलेल्या व्यक्तीनं तो पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. 


रिपोर्टनुसार, पूल नसताना लोक बोटीचा वापर करून कालवा पार करत होते. पण  1966 मध्ये एक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बोट कालव्याच्या खोल पाण्यात बुडाली. या घटनेमध्ये अनेक लोकांनी त्यांचा जीव गमावला. त्यानंतर कालव्यावरील लोखंडी पूल तत्कालीन सरकारने 1972 ते 1975 दरम्यान बांधला होता. काही काळानं या लोखंडी पूलाला समांतर काँक्रीट पूल बांधण्यात आला. गावातील मुले लोखंडी पुलावरून कालव्यात उड्या मारून पोहत होते. 


लोखंडी पूल चोरी करण्यात स्थानिक विभागीय अधिकारी आणि हंगामी कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप माजी ब्लॉक प्रमुख पवन कुमार यांनी विभागीय मुख्य अभियंत्यांना केला आहे. विभागीय सहायक अभियंता राधेश्याम सिंग यांना या प्रकरणाबद्दल विचारले गेले. तेव्हा त्यांनी ते रजेवर असल्याचे सांगितलं. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जेईला तात्काळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा :