Election Commission Press Conference on Assembly Election : कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ  27 मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ  14 मे रोजी संपणार आहे. 


2017 चे विधानसभा निकाल असे होते


उत्तर प्रदेश  - 403 


भाजप+     - 325 


सपा          -  47


बसप         - 19 


काँग्रेस         - 07


इतर           - 05



उत्तराखंड     - 70


भाजप         - 57


काँग्रेस         - 11


इतर           - 02



गोवा           - 40


भाजप         - 17


काँग्रेस         - 13


म. गोमांतक  - 03


गोवा फॉरवर्ड   - 03


इतर               - 04



मणिपूर            - 60


भाजप              - 21


काँग्रेस             - 28


एनपीपी           -  04


एनपीएफ          - 04


इतर               - 3


 


पंजाब          - 117


भाजप          - 3


काँग्रेस          - 77


आप             - 20


अकाली दल       - 15


इतर             - 2


या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते असतील...


निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे


उत्तर प्रदेश


राम मंदिर निर्माण


शेतकरी आंदोलन


हाथरस बलात्कार प्रकरण


लखीमपूर हिंसाचार


गंगेतील कोरोना बळींचे मृतदेह


 


पंजाब


शेतकरी आंदोलनातील पंजाब


पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद


कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा


अंमली पदार्थांचं सावट


पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न


 


गोवा


काँग्रेसमधील गटबाजी


तृणमूल काँग्रेस आणि आपची एन्ट्री


स्थानिक पक्षांच्या आघाड्या


महाविकास आघाडीचा प्रयत्न


रोनाल्ड़ोच्या पुतळ्याचा वाद


उत्तराखंड


भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहरा नाही


सहा महिन्यात तीन मुख्यमंत्री बदलले


शेतकरी आंदोलन


कोरोना आणि प्रशासन


काँग्रेसमध्ये हरिश रावत यांची नाराजी


निवडणूक आयोग कोणते निर्बंध लागू करू शकतो?


कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अशा निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग नियुक्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय लसीकरण पूर्ण केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.  मतदान केंद्रावर 1500 मतदारांऐवजी आता जास्तीत जास्त 1250 मतदारांनाच मतदान करता येणार आहे. एवढेच नाही तर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त ५ जणांना सोबत घेता येणार आहे. त्याशिवाय घरोघरी प्रचारासाठी जास्तीत जास्त ५ जणांनाच परवानगी दिली जाऊ शकते.


नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर होणार?


निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करू शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे अंतिम असतील असे होणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांचे फेरबदल सुरूच राहणार आहेत.