मुंबई : राजस्थान राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या पत्रावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिसाद दिला आहे. कोटामध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे जवळपास दीड हजार ते दोन हजार मराठी विद्यार्थी अडकले आहेत. गहलोत यांच्या प्रतिसादामुळे कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्यजीत तांबे याना पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा होत असून लवकरच निर्णय निघेल अशी आश्वासन दिले आहे. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.


विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही : उदय सामंत 


लवकरच दोन हजाराच्या आसपास मराठी विद्यार्थी स्वगृही परतणार
राजस्थान कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास 1500-2000 विद्यार्थी लॉकडाऊन मुळे अडचणीत अडकले असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परतायची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सत्यजीत तांबे यांना ट्विट करून दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती दिली. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे, सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय : शिक्षण मंत्री उदय सामंत


महाराष्ट्र सरकारकडून प्रतिसाद नाही
राजस्थान राज्यातील कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी राज्याचे मुख्य सचिव कार्यालयात संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप येथील काही विद्यार्थ्यांनी केला आहे. तुम्ही स्वखुशीने तिथं गेला आहात, तिथेच राहा, असा सल्ला त्यांना देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राजकीय व्यक्ती म्हणतात तुमचा विषय चालू आहे, काहीतरी करू, पाहू अशीचं उत्तरे मिळत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना नेलं असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. छत्तीसगडसारखं छोटं राज्यही 75 बस पाठवतंय. छत्तीसगड राज्यातील 2300 विद्यार्थी कोटात अडकले आहेत. मागल एक महिन्यापासून हे विद्यार्थी तिथेचं अडकले आहेत. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तरीही महाराष्ट्र सरकार फारसे सकारात्मक प्रयत्न करताना दिसत नसल्याचे दिसत आहे.


Kota Rajasthan | राजस्थानच्या कोटा शहरात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, खानवळ बंद असल्याने उपासमारीची वेळ