Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही एक समस्या बनली आहे. कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, खाण्याच्या अयोग्य वेळा या गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यासाठी झटपट वजन कमी कसं होईल याकडे भर देण्यात येतोय. सोशल मीडियावर अनेकदा काही ना काही ट्रेंड होत असते. अलीकडे इंटरनेटवर Water Fasting म्हणजेच पाण्याचा उपवास हा एक चर्चेचा विषय बनला आहे. हे एक उपवासाचे तंत्र आहे, ज्यामध्ये माणूस काहीही न खाता, इतर पेय न पिता, फक्त पाण्याने पोट भरतो. या तंत्राने त्याने 13 किलो वजन कमी केल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. नेमकं काय आहे हे Water Fasting?


 


Water Fasting च्या मदतीने 13 किलो वजन कमी केले?


सध्या ॲडिस मिलर नावाची व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्याने जल उपवासाच्या मदतीने 13 किलो वजन कमी केले आहे. सोशल मीडियावर त्याचा अनुभव शेअर करताना एडिसने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला त्याने 21 दिवसांचा जल उपवास सुरू केला आणि या दरम्यान त्याचे वजन 13.1 किलोग्राम (28 पौंड) कमी झाले. एडिसच्या या दाव्यापासून, Water Fasting सतत चर्चेत आहे. त्यामुळे आज आपण Water Fasting म्हणजे काय आणि त्याचे परिणाम जाणून घेणार आहोत.


 


Water Fasting म्हणजे काय?



जल उपवास हे एक तंत्र आहे, जिथे एखादी व्यक्ती ठराविक कालावधीसाठी, सामान्यतः 24 तास ते अनेक दिवस फक्त पाणी पिते. या काळात पाण्याशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय सेवन केले जात नाही. या प्रकारच्या उपवास दरम्यान, शरीर ऊर्जेसाठी शरीराच्या संचयित साठ्यावर अवलंबून असते, ज्यामध्ये यकृत आणि स्नायूंच्या ऊतींमध्ये ग्लायकोजेनचा समावेश होतो.


 


Water Fasting चे फायदे


पाण्याच्या उपवासाच्या या प्रक्रियेमुळे केटोसिस होतो, ज्यामध्ये शरीर ऊर्जा उत्पादनासाठी चरबी ब्रेक होण्यास सुरवात करते. असे मानले जाते की, पाण्याच्या उपवासाने शरीराला अनेक फायदे मिळतात, ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन, वजन कमी करणे इ.


 


Water Fasting चे तोटे


Water Fasting मुळे शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी, त्यामुळे अनेक तोटेही होतात. म्हणून, हे सावधगिरीने आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले पाहिजे. त्याचे काही संभाव्य तोटे जाणून घेऊया-


 


Water Fasting मुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सारख्या पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि हाडांची घनता कमी होणे यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.



या उपवासामुळे जेव्हा ग्लायकोजेनचा साठा संपुष्टात येतो, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करू लागते. हे चयापचय मंदावते आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.



Water Fasting करताना, व्यक्ती फक्त पाण्यावर अवलंबून असते आणि अन्न न खाल्ल्याने, इलेक्ट्रोलाइटची पातळी खूपच कमी होऊ शकते. त्यामुळे चक्कर येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशी लक्षणे दिसू लागतात. तसेच, गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे हृदय विकार सारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकतात.



पाणी प्यायला असूनही, अन्न न खाल्ल्यामुळे कधीकधी डिहायड्रेशन होऊ शकते. अन्नामुळे पाणी पिण्याची इच्छा वाढते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्याशिवाय डिहायड्रेशन होते. यामुळे डोकेदुखी, थकवा आणि मूत्रपिंडाचे खराब कार्य होऊ शकते.



जेव्हा तुम्ही बराच वेळ पाणी उपवास केल्यानंतर पुन्हा अन्न खाण्यास सुरुवात करता, तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे मळमळ, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या यासारख्या समस्या निर्माण होतात.


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो स्वत:लाही जपा, 'या' कारणांमुळे चाळीशीतच जातेय मासिक पाळी, तोटे जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )