छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील (Marathwada) विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार 496 गावात एकूण 47.42 एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे, मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ (Drought) असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 652 गावांचा अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत आहे. 


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील खरीप हंगाम 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, ज्यात विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. विभागातील एकूण 56 लाख 15  हजार 10.65 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी 50 लाख 97 हजार 606.62 हेक्टरवर पेरणी झाली. तर 4 लाख 79  हजार 866.61 क्षेत्र पडीक राहिले आहे. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. 


अपेक्षित मदत निधी



  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 123 कोटींची मदत अपेक्षित 

  • जालना 115 कोटी 

  • परभणी 9 कोटी 

  • हिंगोली 10 कोटी 

  • नांदेड 5 कोटी 

  • लातूर 16  लाख 

  • बीड सव्वा लाख

  • धाराशिव 2.5  कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.


पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावे



मराठवाड्यात परिस्थिती गंभीर...


गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. विभागातील आठ ही जिल्ह्यात अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी देखील 50 पैश्यांच्या आतमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या घोषणेच्या व्यतिरिक्त विशेष दुष्काळी पॅकेज देखील जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


दुष्काळाची दाहकता सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, केंद्रीय पथकासमोर ढसाढसा रडले