अहमदनगर : नगर आणि बीड वासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली नगर- आष्टी रेल्वे (Ahmednagar Ashti Railway) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 67 किलोमीटर अंतराच्या या रेल्वेची चाचणी होऊन देखील अजूनही रेल्वे सुरू झालेली नाही. दहा कोटी रुपयांचे नगर-आष्टी रेल्वेचे इंजिनसह 10 डब्बे अहमदनगर रेल्वे स्थानकावर धूळखात पडून आहेत.  


अहमदनगर रेल्वे स्थानकावर दहा डब्ब्यांची रेल्वे अक्षरशः धूळखात पडलीय. ही रेल्वे नगर ते आष्टी या मार्गवर धावणार असून, दोन ते तीन वेळा चाचणी होऊन देखील ही रेल्वे मागील तीन महिन्यांपासून स्थानकावरच उभी आहे.


नगर-परळी रेल्वे मार्गाची लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झालंय. या रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. परंतु, प्रतक्षात या मार्गावर रेल्वे काही सुरू झाली नाही.  चाचणी पूर्ण झाल्यामुळे मागच्या तीन महिन्यांपासून नगर-आष्टी रेल्वेचे उद्घाटन कधी होणार याविषयी चर्चा होती आहे. तीन वेळा तारीख जाहीर होऊन देखील ही रेल्वे काही सुरू झालेली नाही.
 
नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. ही रेल्वे सुरू झाली तर आष्टी आणि नगरच्या शेतकरी , विद्यार्थी आणि नोकरदारांनाही फायदा होणार आहे. मात्र केवळ काही बड्या नेत्यांना उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने ही रेल्वे सुरू होत नसल्याचे नागरिक सांगतात.


1995 ला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्षे राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते. सध्या या प्रकल्पाची किंमत चार हजार कोटींच्या पुढे गेलीय. नगर आष्टी मार्गही पूर्ण झालाय. पण रेल्वे धावत नाहीय.


महत्वाच्या बातम्या


Bhagat Singh Koshyari Controversy: राज्यपालांचा तात्काळ राजीनामा घ्या; बारामतीच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची थेट राष्ट्रपतींकडे लेखी मागणी 


Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या मराठी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया