Asur 2 Review : 'असुर'च्या पहिल्या सीझनची कथा जिथे संपते तिथूनच दुसऱ्या सीझनच्या (Asur 2) कथानकाची सुरुवात होते. 'असूर'च्या शेवटी शुभ जोशी तुरुंगात जाताना दिसत आहे. त्यावेळी त्याचं वयदेखील कमी होतं. पण आता मोठा झाल्यावर तो बदला घेण्यासाठी परततो. शुभने लहानपणीच मोठा झाल्यावर राक्षस (असुर) व्हायचं ठरवलं होतं. त्यामुळे आता तो कसा बदला घेतो हे 'असुर 2'मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शुभच्या वागणुकीत झालेला बदल पाहून धनंजय राजपूत म्हणजेच अर्शद वारसीलाही धक्का बसतो. आता धनंजय राजपूत आणि निखिल नायर (वरुण सोबती) शुभला रोखू शकतील का? याचं उत्तर प्रेक्षकांना सीरिजमध्ये मिळेल. 


'असुर'च्या पहिल्या सीझनमध्ये चांगलं आणि वाईट यांच्यातील युद्ध दाखवण्यात आलं आहे. तर आता दुसऱ्या सीझनमध्ये हे युद्ध शिगेला पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. शुभ जोशी हा सीरियल किलर आहे. त्याचा भारतीय पौराणिक कथांवर खूप विश्वास आहे. महायुद्ध करण्याची त्याची इच्छा आहे. पण आता सीबीआय आणि फॉरेन्सिक तज्ञ म्हणजेच धनंजय कपूर आणि निखिल नायर या असुरला पकडू शकलील का? त्यांना त्याचा प्लॅन कळेल का? हे सीरिजमध्ये कळेल.  


'असुर'चा पहिला सीझन संपल्यानंतर खरा असुर कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता असुर नक्की कोण आणि त्याचं काय होणार या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळतील. धनंजय राजपूत आणि निखिल नायर हे खटल्यादरम्यान अनेक अडचणींचा सामना करताना दिसणार आहेत. 'असुर'मधील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या संकटाचा सामना करत असल्याचं सीरिजमध्ये पाहायला मिळत आहे. केसर भारद्वाज की शुभ जोशी? खरा सिरीयल किलर कोण?


'असुर 2' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा ओनी सेनने सांभाळली आहे. या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. पहिल्या सीझनपेक्षा दुसऱ्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट दाखवण्यात आले आहेत. 'असुर'च्या पहिल्या सीझनमध्ये शुभ जोशी आपल्या वडिलांना किती निर्दयीपणे मारतो हे आपण पाहिले आहे. पण दुसऱ्या सीझनमध्ये त्याचं कठोर रुप पाहायला मिळालं आहे. प्रत्येक एपिसोडची सुरुवात शुभ जोशीच्या भूतकाळातील प्रवासाने होते. 


अरशद वारसी आणि वरुण सोबती ही जोडी 'असुर 2'मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धनंजय राजपूतच्या भूमिकेत अरशद वारसी आहे. तर फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या भूमिकेत वरुण सोबती. रिद्धी डोगरा, अनुप्रिया गोएंका आणि शुभ गिल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या थक्क केलं आहे.