Mental Health : सध्याची बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि तणावामुळे अनेक लोक नैराश्याचे बळी बनत आहेत. आपण अनेकदा बातम्या ऐकतो की, लोक नैराश्यामुळे आत्महत्याही करतात. गेल्या काही वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नैराश्य टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. नैराश्य कसे टाळावे आणि तणाव कसा कमी करावा? याबाबत स्वामी रामदेव यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. त्या जाणून घ्या...
आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
एका अभ्यासानुसार, भारतात मोठ्या संख्येने लोक जीवनाचा त्याग करत आहेत. त्यामुळे देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आकडेवारीनुसार, भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख 70 हजार लोक आत्महत्येच्या घटनांमध्ये सुमारे 4.5% वाढ झाली आहेत आणि यामध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश आहे, मग ते लहान मुले असो किंवा प्रौढ. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, महिला पुरुषांपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असतात. सर्वेक्षणानुसार, पुरुष कसलाही विचार न करता चुकीची पावले उचलतात किंवा पटकन हार मानतात. तर महिला स्वतःची खूप काळजी घेतात.
तणाव आणि नैराश्याची प्रमुख कारणं
एका अभ्यासानुसार, अनेकांच्या आत्महत्येमागे तणाव आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आहेत. अनेक वेळा अपयश, कामाचा ताण आणि बिघडत चाललेल्या नात्यांमुळेही लोक निराश होतात. असे लोक जीवनाचा त्याग करतात आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचा विचार करतात. नैराश्य आणि ताणतणाव टाळण्यासाठी तरुण, महिला आणि पुरुषांनी योगाला आपला सोबती बनवायला हवा. दररोज ध्यान करण्याची सवय लावा आणि स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. योगगुरू स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घ्या डिप्रेशनपासून मुक्ती कशी मिळवायची?
मानसिक आजार कसे ओळखावे?
दुःखअस्वस्थताअनावश्यक भीतीएकटेपणाऊर्जेचा अभावसतत थकवाचिंताआहारात बदलऔषधाची सवय
मानसिक आजाराची लक्षणे
खराब स्मृतीएकटेपणाची सवयस्वतःवर रागावणेदुःखदारूचे व्यसनराग
आनंदी हार्मोन्स कसे वाढवायचे?
काम करातणावापासून दूर राहापाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवानिरोगी अन्न खास्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करालवंग खाल्ल्याने मूड फ्रेश होतोवेलची खाल्ल्याने तणाव कमी होतोबडीशेप खाल्ल्याने चिडचिड कमी होते
आनंदी कसे राहायचे?
इतरांना मदत करादर तासाला 10 सेकंद स्ट्रेचिंग करातुमच्या प्रिय व्यक्तींची हसतमुख छायाचित्रे तुमच्या समोर ठेवागोड खाल्ल्याने आनंद वाढतो
वाढलेली आक्रमकता कशी नियंत्रित करावी?
थोडा वेळ फिरायला जारोज योगा कराध्यान करादीर्घ श्वास घ्यासंगीत ऐकाचांगली झोप घ्या
राग धोकादायक आहे.. सावध रहा
रागाचे स्वरूप समजून घ्यारागाने तुमचा स्वभाव गमावू नकाआत्मनियंत्रण शिकारागाची लक्षणे ओळखा
तणाव कमी करण्यासाठी काय खावे?
हिरव्या भाज्यामसूरहरभराकाजूबदामलिंबूफळे
मन शांत ठेवण्यासाठी ही फळे खा
सफरचंदकेळीजांभूळटरबूजस्ट्रॉबेरीपपईकिवी
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )