Health Tips: भात (Rice) आणि चपाती (Roti) या दोन्ही गोष्टींचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश असतो. या दोन्हींमधून आपल्याला ऊर्जा मिळते. पण चपाती आणि भात यामधील आरोग्यासाठी अधिक चांगलं काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 


भात हे जगभरात सर्वाधिक खाल्लं जाणारं अन्न (Food) आहे. तर चपाती हा एक भारतीय ब्रेडचा प्रकार आहे. गव्हाच्या पिठापासून किंवा इतर धान्याच्या पिठापासून चपाती बनवता येते. याच प्रकारे तांदूळही विविध प्रकारांत उपलब्ध असतो. तर आता चपाती आणि भात यापैकी आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? हे जाणून घेऊया.


भात आणि चपातीत कॅलरीजचं प्रमाण जवळपास सारखंच असतं, म्हणजेच दोन्ही खाल्ल्याने जवळपास समान कॅलरीज मिळतात. परंतु मधुमेही रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना कॅलरीजवर जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही एका दिवसात किती कॅलरीज घेत आहात, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.


पोषणतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कार्बोहायड्रेट खाल्ल्याने वजन वाढत नाही. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासोबतच ते चरबीचं पचन करण्यास मदत करतात. सर्व प्रकारचे धान्य, ब्राऊन राईस आणि मसूर चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. आपल्या दैनंदिन आहारात कमीतकमी 60 टक्के कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असले पाहिजे.


भात फायदेशीर की चपाती?


जर आपण चपाती आणि तांदळातील कार्ब्सबद्दल बोलायचं झालं तर तांदूळ पॉलिश करताना फायबर काढून टाकले जाते, यामुळे खराब कार्ब्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे जास्त भात खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तथापि, तांदळामध्ये असलेले अमाइलोपेक्टिन  (Amylopectin) पचण्यास सोपे आहे आणि त्यामुळे ते बाळांसाठी एक चांगला पर्याय बनते.


त्याच वेळी, भातापेक्षा चपातीमध्ये अधिक पोषक तत्वं आढळतात. चपातीत फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. प्रोटिन्सच्या संख्येबद्दल बोलताना, दोन्हीमध्ये ते जवळजवळ समान प्रमाणात आढळतात.


या गोष्टींवर लक्ष द्या


रोटी आणि भात दोन्ही आरोग्यदायी आहेत. या दोन्हींमधून शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात. पण तुम्ही चपात्यांची संख्या आणि तांदळाचं प्रमाण लक्षात ठेवावं. अर्धा वाटी भात आणि चार चपात्या खाणं हा उत्तम पर्याय आहे. तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ते जास्त खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.


हेही वाचा:


Health Tips : सफरचंद आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या ते खाण्याची योग्य वेळ कोणती?