Health Tips : निरोगी राहण्यासाठी पाणी (Water) पिणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जास्त पाणी पिणं देखील शरीरासाठी हानिकारक असू शकते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जास्त पाणी पिणं इतकं हानिकारक असू शकतं की त्यामुळे तुमचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. जास्त पाणी प्यायल्याने पाणी विषारी होऊ शकते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पाण्याची विषारी क्षमता म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? तसेच, हे कसं टाळता येईल.
जास्त पाणी प्यायल्याने पाण्याची विषारीता निर्माण होते. या आजारात किडनीमध्ये पाणी साचू लागते. त्यामुळे रक्तात सोडियम जमा होऊ लागते. त्यामुळे शरीराला पाणी पचण्यास त्रास होऊ लागतो. ज्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात.
पाण्याच्या विषारीपणाची प्रारंभिक लक्षणे कोणती?
शरीराला जास्त पाणी मिळते म्हणून पाण्याच्या विषारीपणाचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यामुळे ओव्हर हायड्रेशन होते. अशा परिस्थितीत काय होते की शरीर काही वेळानंतर पाणी शोषण्यास सक्षम नसते. त्यामुळे पाणी बाहेर येण्याचा प्रयत्न होतो.
- ओव्हर हायड्रेशनमुळे शरीराला थकवा, सुस्तपणा आणि कमी ऊर्जा जाणवू लागते.
- डोकेदुखीबरोबरच अंगदुखीचीही समस्या निर्माण होते.
- उलट्यांसह मळमळ होण्यास सुरुवात होते.
- शौचालयास वारंवार जावं लागतं.
जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर तुम्हाला 'या' टिप्स फॉलो कराव्या लागतील
पाण्याचा विषारीपणा टाळायचा असेल तर हे काम करावे लागेल.
- जर तुम्ही व्यायामादरम्यान जास्त पाणी प्यायले असेल तर तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स प्यावे.
- इलेक्ट्रोलाइट्सबरोबरच फळांचा रस आणि नारळ पाणी प्यावे.
- तहान लागल्यावर एकाच वेळी भरपूर पाणी पिणे योग्य नाही.
- तुमच्या शरीरानुसार पाणी प्या
एका दिवसात शरीरासाठी किती पाणी पिणं आवश्यक आहे?
तज्ज्ञांच्या मते, दिवसाला तीन लिटर पाणी पिणे शरीरासाठी चांगले आहे. पण तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेकडेही पाहणं गरजेचं आहे. जर दिवसाला तीन लीटर पाणी पिण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता. एवढे पाणी पिणे शक्य नसेल तर स्वत:ला त्रास देऊ नका. पाणी एकाच वेळी पिण्याऐवजी हळूहळू पिणं कधीही चांगले आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :