शिल्पाला भाभीजी घर पे है ही मालिका सोडायची असून तिच्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री मिळत नसल्यानं मालिकेच्या निर्मात्यांशी शिल्पाचा वाद झाला. या वादानंतर शिल्पानं मालिका सोडली आणि त्यानंतर नाराज झालेल्या निर्मात्यांनी शिल्पाला नोटीस बजावत पूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्येच तिच्यावर बंदी आणण्याची मागणी केली.
याविरोधात शिल्पाच्या समर्थनात मनसेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपण निर्मात्यांच्या नोटिशीला वेळोवेळी उत्तर देत असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. तर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भेदभावाविरोधात मनसेने आवाज उठवला आहे.