Ankita Lokhande Sushant Singh Rajput: 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या कार्यक्रमातून अर्चनाच्या भूमिकेतून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही घराघरात पोहचली. या कार्यक्रमामध्ये अर्चना आणि मानव या जोडीला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं. नुकतीच या मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अंकिताने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 


पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत ही जोडी प्रेक्षकांच्या देखील खूप पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला. पण काही कारणास्तव त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण अंकिता या मालिकेच्या निमित्ताने तिचे आणि सुशांतचे काही फोटो शेअर केले आहेत. 


'पवित्र रिश्ता' मालिकेला 15 वर्षे पूर्ण


अंकिताने तिच्या सोशल मीडियावर मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने म्हटलं की, 'ही केवळ 15 वर्षांची अर्चनाची नाही, तर अर्चना आणि मानव यांचीही 15 वर्षे आहेत, ज्यांना प्रेम, लग्न, समजूतदारपणा समजला. परिपूर्ण विवाह म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवले. अर्चना आणि मानव यांच्यासारखी ऑन-स्क्रीन जोडी नाही आणि याचं संपूर्ण श्रेय प्रेक्षकांना जातं ज्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं.


अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'मानवने अर्चना पूर्ण केली. अर्चनाचा उल्लेख केल्यावर तो होता, आहे आणि सदैव स्मरणात राहील कारण त्याचं आणि माझं नातं तुम्हा सर्वांसोबतच्या नात्याइतकंच पवित्र आहे. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय मी आज जे आहे ते बनले नसते. तसेच या पोस्टच्या शेवटी अर्चनाने मालिकेतल्या गाण्याच्या ओळीही लिहिल्या आहेत.  


'फक्त अर्चना बनणं माझ्या नशिबी होतं'


तिच्या करिअरबद्दल सांगताना अंकिताने म्हटलं की, '15 वर्षांपूर्वी मी 'पवित्र रिश्ता'मध्ये अर्चना म्हणून माझा प्रवास सुरू केला होता. मला माहित नव्हते की वर्षांनंतरही मला माझ्या व्यक्तिरेखेसाठी इतकं प्रेम मिळत राहील, जी माझी ओळख बनली आहे. कधी कधी वाटतं की अर्चना बनणं हेच माझं नशीब होतं. ती माझ्या आत होती आणि आजही ती माझ्या आत आहे. त्या व्यक्तिरेखेने मला आयुष्याबद्दल खूप काही शिकवले आहे.


'पवित्र रिश्ता' मालिकेबद्दल जाणून घ्या...


'पवित्र रिश्ता' या मालिकेचा समावेश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये केला जातो. एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली होती. 2009 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत होते. अंकिता आणि सुशांतची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाले. 






ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक