Bigg Boss Marathi New Season Day 33 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की-अरबाजची मैत्री आणि केमिस्ट्री चर्चेत पाहायला मिळत आहे. मात्र, आता या मैत्रीचं समीकरण बदलताना दिसत आहे. निक्की आणि अरबाजच्या मैत्रीत दुरावा आल्याचं दिसत आहे. यामुळे निक्की आणि अरबाज दोघांनाही त्रास होत असल्याचं दिसत आहे. यावर आर्या अरबाजला  निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला देते.


निक्की-अरबाजच्या मैत्रीचा गोड शेवट होणार?


'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. सदस्य एकमेकांवर नाराज आहेत. निक्की आणि अरबाजची पहिले चार आठवडे चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण आता मात्र ते एकमेकांपासून दुरावले आहेत. आजच्या भागात आर्या अरबाजला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला देताना दिसून येणार आहे.


अरबाजला निक्कीसोबत बोलण्याचा आर्याचा सल्ला


आजच्या भागात आर्या अरबाजला म्हणत आहे, "तू ज्या परिस्थितीत आहेस त्यातून मी गेली आहे. त्यामुळे मला तुला असं पाहावत नाही. तुला निक्कीसोबत बोलायचं असेल तर बोल..पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने जर तुला दुखावलं तर.. तू तुझं सर्वोत्तम दे...तिच्यासोबत बोल... पण तरी पुन्हा ती असचं वागली तर परत तिच्याकडे जाऊ नको. कारण तू जेवढं तिला सांगशील एखादी गोष्ट न करण्यासाठी तेवढी ती जास्त करेल".


निक्की आणि अरबाजच्या मैत्रीचं पुढे काय?






अरबाज पुढे आजच्या भागात निक्कीसोबत बोलताना दिसणार आहे. अराबाज निक्कीचं बोलणं जान्हवीला मात्र चांगलच खटकत आहे. त्यामुळे निक्की म्हणतेय,"मी तुझ्यासोबत बोललेलं तुझ्या बहिणीला आवडत नाही. चांगल्या टर्मवर आपण हे थांबवूयात. अनेक दिवस आपल्याला या घरात राहायचं आहे. सगळेच मला तुझ्यापासून दूर ठेवत असतील तर मलादेखील आता एक अंतर ठेवायचं आहे".


निक्कीला अरबाजसोबत करायचाय मैत्रीचा गोड शेवट






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nikki Tamboli : बिग बॉस फेम निक्की तांबोळीचं छत्रपती संभाजीनगर कनेक्शन, मराठमोळी मुलगी साऊथ इंडस्ट्रीतील नायिका