Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे.सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. पण मालिकेच्या आगामी भागात दीपू कोमातून बाहेर येणार आहे. 


दीपू कोमात गेल्यामुळे देशपांडे सर आणि इंद्रा निराश झाले होते. दीपूचा गंभीर अपघात झाल्याने तिची अवस्था पाहून इंद्रा स्वत:ला सावरू शकेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. सानिकाचा अपघात कसा झाला हे इंद्राच्या बहिणीने पाहिले आहे. त्यामुळे सानिका किती खोटं बोलते आहे हे तिला चांगलेच माहीत आहे. दीपूच्या अपघाताचे सत्य अखेर सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात इंद्राची आई आणि देशपांडे सर सानिकाचा स्वीकार करतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे. 


 सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्य अखेर आले देशपांडे सरांसमोर


सानिका इंद्राच्या भावाची पत्नी असल्याने इंद्रा थेट सानिकासोबत बोलण्याचे टाळतो आणि कार्तिकला सुनावतो. त्यावेळी कार्तिक इंद्राला सानिकासंबंधित सर्व गोष्टी सांगतो. सानिकामुळेच दीपूचा गंभीर अपघात झाला असल्याचे सत्य कार्तिक इंद्राला सांगतो. मालिकेच्या आगामी भागात इंद्राची आई सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्य देशपांडे सरांना सांगणार आहे. त्यानंतर देशपांडे सर सानिकाच्या कानाखाली बाजवतात. सानिकाच्या वागणूकीमुळेच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


हृताने मालिकेच्या शूटिंगला केली सुरुवात


हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर हृता परदेशी फिरायला गेली होती. पण आता ती फॉरेन टूरवरून परत आली आहे. तसेच तिने 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे मालिकेत हृता आता कोमातून बाहेर आलेली दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : कार्तिक सोडणार सानिकाची साथ; दिपूची अवस्था पाहून इंद्रा स्वतःला सावरू शकेल?


Man Udu Udu Zhala : दीपूचा होणार गंभीर अपघात; सानिकाला होईल का बहिणीवरच्या प्रेमाची जाणीव?