स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरु असलेली 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या बरीच रंजक वळणावर आहे. आशुतोषच्या जाण्याने खचलेली अरुंधती पुन्हा नव्याने उभी राहिली असून तिला आता मिहिरतची देखील साथ मिळाली आहे. एका पाककलेच्या स्पर्धेत अरुंधती मिहिरसोबत सहभागी होते. त्याचवेळी या स्पर्धेत अनिरुद्ध आणि संजना देखील भाग घेतात. या सगळ्यात एका खास गोष्टीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनुपमा आणि अरुंधती यांची भेट झाली. 


अनुपमा आणि अरुंधतीची ही भेट सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चेत आलीये. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने या भेटीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांनी कमेंट करत  त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. तर काहींना या दोन्ही मालिकांना महाएपिसोड करण्याची देखील मागणी केलीये. अभिनेत्री मधुराणीने अनुपमा  म्हणजेच रुपाली गांगुलीसाठी पोस्ट लिहिली आहे. 


मधुराणीने पोस्टमध्ये काय म्हटलं?


मधुराणीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं की, अरुंधती आणि अनुपमा एकमेकींना जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा त्या कायम अशाच भेटतात...Director's kut production ची 'आई कुठे काय करते' ' स्टार प्रवाह 'वर आधी सुरू झाली आणि प्रेक्षकांनी त्या मालिकेला प्रचंड उचलून धरल्यावर त्याच कंपनीची काही महित्यातच स्टार प्लसवर 'अनुपमा' आली! दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत बनल्या. हिंदी मालिका म्हंटल्यावर त्याचा पोत साहजिकच वेगळा असणार आणि मराठीचा वेगळा. पण अरुंधती आणि अनुपमाचा मूळ प्रवास एकच होता.तोच धागा आहे मला आणि रुपालीला जोडणारा.एकेमेकींविषयी असणारं प्रेम , काळजी आणि आदर हाच आमच्या नात्याचा स्थायीभाव आहे . रुपाली तुला खूप खूप प्रेम.  






दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेच्या कथेवर सध्या प्रेक्षक बरेच नाराज आहेत. तशीच काहीशी स्थिती अनुपमाची देखील पाहायला मिळते. या दोघींच्या भेटीच्या पोस्टवरही अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या मालिकेवर टीका केली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


ही बातमी वाचा : 


Hardik Pandya-Natasa Stankovic : दोन लग्नाचा घाट, चार वर्षांचा संसार; हार्दिक-नताशामध्ये सगळंच संपलं? जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा