Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक वळणं घेत आहे. आता या मालिकेत अरुंधतीचा पुन्हा एकदा एक नवा प्रवास सुरु झाला असून यामध्ये अनेक अडथळे येत आहे. दरम्यान या मालिकेवर आता प्रेक्षक चांगलेच नाराज असून मालिका बंद करण्याचा वारंवार मागणी केली जातेय. तरीही चॅनलकडून ही मालिका सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतच आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यावरही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


संजना अरुंधतीसोबत नीट वागत होती, पण गौरीमुळे पुन्हा एकदा संजनाचा अरुंधतीवर आणि यशवर रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संजना पुन्हा एकदा अरुंधतीविरोधात कट कारस्थानं करते. तिने अनिरुद्धचे कान भरले असून सध्या अनिरुद्ध घरावरुन आई आणि अप्पांशी वाद घालतोय. इतकचं नव्हे तर त्याने आई अप्पांना कोर्टात खेचण्याची देखील धमकी दिली आहे. त्यानंतर मालिकेचा आता नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. 


मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये काय?


मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये संजना कांचन आईला घरावरुन खूप काही ऐकवते. त्याचा कांचन आईला त्रास होतो आणि तिच्या छातीत दुखू लागतं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करतात. तेव्हा आप्पा हे सगळं संजना आणि अनिरुद्धमुळे झालंय असं म्हणतात. त्यावर अरुंधतीही त्यांना या घरात ज्येष्ठ नागरिकांवर घरगुती हिंसाचार होतो म्हणून पोलिसांत तक्रार करेन अशी सक्त ताकीद देते.                    






प्रोमोवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी


दरम्यान या प्रोमोवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळतंय. यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती, तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, अजून किती अंत बघणार आहेत तुम्ही प्रेक्षकांचा? अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.




ही बातमी वाचा :


Kiran Mane : 'त्यावेळी' अभिमानाने 'चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण' जात सांगितली, आता ताई हिंदू कशी झाली? केतकी चितळेच्या पोस्टवर किरण मानेंचा सवाल