Sukh Mhanje Nakki Kay Asta : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय फॅमिली ड्रामा अर्थात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) सध्या प्रेक्षकांना आकर्षित करून घेत आहे. मालिकेच्या कथेतील ट्विस्ट आणि सतत येणारी नवी वळणं प्रेक्षकांची मालिकेतील रुची वाढवत आहेत. सध्या मालिकेत एक नवा आणि हटके ट्रॅक पाहायला मिळतोय. नेहमी शांत असणारी, मितभाषी गौरी आता चक्क एका हटके अवतारात दिसत आहे.


मालिकेत जयदीप आणि मानसी यांनी मिळून गौरीला संपवण्याचा कट रचला होता. मात्र, या कटातून सुखरूप बचावलेली गौरी आता पुन्हा एकदा शिर्के-पाटील कुटुंबात परतली आहे. पण, यावेळी ती गौरी म्हणून या घरात आलेली नाही. नवा रांगडा अवतार घेऊन ती आता बदला घेण्यासाठी या घरात परतली आहे.


जयदीपने केला गौरीला संपवण्याचा प्रयत्न!


मानसी आणि जयदीप यांनी मिळून गौरीला संपवण्याचा कट रचला होता. या प्लॅननुसार जयदीप गौरीला कड्यावरून ढकलून देतो. त्याने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला, असे वाटले होते. पण गौरी सारख्या दिसणाऱ्या मुलीची एण्ट्री या मालिकेत झाली आहे. मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली तरी ही आलेली पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे.


गौरी माईंना सांगणार सत्य


गौरीने घरात तर प्रवेश केला आहे. मात्र, तिच्या या बदललेल्या वागणुकीमुळे माई दुखावल्या गेल्या आहेत. यानंतर आता गौरी माईंना सगळी सत्य परिस्थिती सांगणार आहे. मानसी आणि जयदीपने मिळून कसं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्मृती गेलेली नसून, केवळ या दोघांच्या या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हे सोंग करत असल्याची कबुली गौरी माईंना देणार आहे.


'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगांवकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha